येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांसाठीही नुकसानभरपाईचे पॅकेज जाहीर करू – मंत्री नितेश राणे

कुणकेश्वर (प्रतिनिधी) : मत्स्यबंदीमुळे गेले तीन महिने मच्छीमार बांधवांना व्यवसाय करता आला नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. आमच्या महायुती सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला असून त्यामुळे मत्स्यव्यवसायिक आणि मत्स्य कास्तकार हे आता शेतकरी दर्जाचे आहेत.

येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांसाठीही नुकसानभरपाईचे पॅकेज जाहीर करू, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वर येथे झालेल्या संवाद मेळाव्यात दिले आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सर्व मच्छीमारांनी निश्चिंत राहावे — मी तुमचा भाऊ म्हणून नेहमी पाठीशी आहे. सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ घ्या आणि मत्स्यव्यवसाय अधिक मजबूत करा.