कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संदीप सावंत वाढदिवसानिमित्त वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ जून रोजी स. १० वा. वागदे येथे मुंबई – गोवा महामार्गाच्या दुतर्फा सुमारे ६ किमी. परिसरात (गडनदी पुल ते डंगळवाडी) सावली देणाऱ्या झाडांची लागवड केली जाणार असल्याची माहिती वागदे सरपंच संदीप सावंत यांनी दिली. ते म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणावेळी झाडे तोडण्यात आली, त्यामुळे महामार्गावर सावलीसाठी एकही झाड नाही. म्हणूनच आम्ही महामार्गावर दुतर्फा सावली देणारी झाडे लावणार आहोत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व व पुढील पिढ्यांना हिरवागार परिसर दिसावा यासाठी प्रत्येकाने ‘एक तरी झाड लावावे’ असा संदेश यातून आम्ही देणार आहोत. २३ जून रोजी स. १० वा. गडनदी पुलापासून या वृक्षारोपणास प्रारंभहोणार आहे. या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी, पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप सावंत यांनी केले आहे.












